रविवार, १३ ऑक्टोबर, २०१३

           

      वसंतामृतमाला
 विदूषक आणि भिकारी (पुष्प दुसरे ) 


      
यामिनीने प्रश्न विचारला, " अत्रेय उपनिषदात असे म्हटले आहे की दृष्टी म्हणजे मनःचक्षुंनी पाहणे . तुम्ही सामान्य लोकांसाठी हे स्पष्ट करून सांगितले परंतु तुम्ही हे सर्व कसे पाहता ?"
          ह्याला माझे उत्तर असे आहे . तरुण वयापासूनच मी कोणतीही गोष्ट भौतिक दृष्टीकोनातून कधीही पाहिली नाही . प्रत्येक गोष्ट मी अध्यात्माशी जोडली . ' तोडजोड ' या नावाने मी याविषयी सविस्तर लिहिले आहे . सामान्य लोकं एखादी गोष्ट त्यांच्या चर्मचक्षूंनी पाहतात आणि काही गोष्टी मनःचक्षूंनी मी जे जे काही माझ्या चर्मचक्षूंनी पाहते ते सर्व मी परमेश्वराशी  जोडते . मी याची अनेक उदाहरणे यापूर्वी दिली आहेत . स्वामी आता फोटो , वस्तू आणि इतर गोष्टी देतात आणि मला लिहायला सांगतात . मी त्या प्रत्येक गोष्टीतील ज्ञानावर लिहिते . जे जे काही मी पाहते . मला त्याचे बाह्य रूप दृष्टीस पडत नाही . मी केवळ त्यातला गर्भितार्थ पाहते . मी प्रत्येक गोष्टीत अंतर्भूत असलेल्या दिव्यत्वाविषयी सांगते . या जगामध्ये दिव्यत्वाविरहीत असे काहीही नाही सर्वकाही त्या एका परमेश्वरातूनच येते . भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे . की ही संपूर्ण सृष्टी म्हणजे एका धाग्यामध्ये ओवलेल्या मण्यांच्या माळेसारखी आहे . हे मणी म्हणजे सृष्टीतील वेगवेगळी निर्मिती . परमेश्वर हा त्या ओवलेल्या माळेचा धागा . जेव्हा आपण माळ पाहतो तेव्हा धागा दृष्टीस पडत नाही . केवळ मणी दिसतात . याप्रमाणे सर्वजण बाह्यजग पाहतात आणि संभ्रमित होतात . बाहेर दिसणारे मणी वेगळे असतात . मनुष्य ' मी आणि माझे ' करण्यात निरर्थक वेळ घालवतो . 
              स्पर्श संवेदना ही जन्मघेण्यास कारणीभूत असते . माणसाच्या मनाला जे जे स्पर्श करून विचलित करते ते सर्व म्हणजे स्पर्श संवेदना. परिणामतः मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म मृत्युच्या फे-यात अडकतो मनुष्याच्या अतृप्त इच्छा वासना पुढील जन्मास कारणीभूत ठरतात . हे सत्य जाणून आपण त्याचा लाभ घेतला  पाहिजे . केवळ ज्ञानच मनुष्याला पुन्हा जन्म घेण्यापासून मुक्त करू शकते . मन हे सदैव कोणत्या ना कोणत्या गोष्टीची मागणी करत असते. मनुष्याच्या मनात सतत काही ना काही इच्छा उदभवत असतात . मनुष्याला सतत काहीतरी हवे असते स्वामींनी एका प्रवचनात असे सांगितले , "तुम्ही भिकारी नाही सिंह आहात. " तसेच 'सत्य साई स्पीक्स ' भाग ५ यातील पान नं. ८ वर ते म्हणतात .
            " जन्मामागून जन्म गेले तरी तुम्ही भिका-याची आणि विदूषकाची भूमिका करून दमला नाहीत का ? आता या जन्मात तरी उदात्त भूमिका करण्यासाठी प्रेरित व्हा ." 
               असे स्वामी म्हणाले . मनुष्य जन्मानुजन्म एखाद्या भणंग भिकाऱ्यासारखा कशाच्या तरी शोधात वणवण फिरतो आहे . आज स्वामी आपल्या बरोबर येथे आहेत . आतातरी आपण ही भिकाऱ्यासारखी वणवण थांबवली पाहिजे . सर्वजण येथे परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी आले आहेत . हे आपण जाणले पाहिजे. इच्छा वासनांमुळेच मनुष्य सैरभैर होऊन वणवण भटकतो आहे . आपल्या इच्छा वासनांची तृप्ती करण्यासाठी तो इकडे तिकडे धावतो आहे . प्रयत्नांची पराकाष्ट करतो आहे . ही सर्व माया आहे . हे सर्व क्षणभंगुर आहे,  अशाश्वत आहे. जर हे जाणले तर तुम्हाला शाश्वत आनंदाची प्राप्ती होईल . परमेश्वरप्राप्तीसाठीच आपल्याला हा जन्म दिला आहे . 
          आपल्या प्रत्येकामध्ये एक दिव्य शक्ती आहे . जर हे जाणले आणि तिचा योग्य मार्गाने उपयोग केला तर मनुष्य परमपदास पोहचू शकतो . मनुष्याला ह्याची जाणीव नसते की तो स्वतः एक भिकारी आहे . जेव्हा दारावर एखादा भिकारी येतो तेव्हा तो त्याच्याकडे पाहून घृणा व्यक्त करतो आणि त्याला हाकलवून लावतो . आपल्या शुल्लक इच्छा आकांक्षा पु-या करण्यासाठी आपण स्वाभिमान गमावून एखाद्या भिकाऱ्यासारख्या विनवण्या करतो . 
             जग ही एक रंगभूमी आहे व सर्वजण रंगकर्मी आहेत . सर्वजण परमेश्वराचा अंश म्हणून जन्मले आहेत . आपण आपल्या जीवनातून हे सत्य दर्शवले पाहिजे . सर्वजण त्या एका परमेश्वराची लेकरे आहेत . सर्वांनी हे घोषित करायला हवे . 
             मी एका भिकाऱ्याचा  मुलगा नाही ! या नाट्यात मी एक राजपुत्र आहे , राजाचा मुलगा . मी सम्राट सत्य साईचा पुत्र आहे , विदूषकाचा नव्हे . 
             प्रत्येकाने असा विचार करायला हवा . आपले जीवन ह्या विचारानुसार व्यतीत करू अशी प्रतिज्ञा करायला हवी . तथापि , जीवन कसे जगावे ? आपण सर्वांशी विनम्रतेने प्रेमाने वागायला हवे . आपल्या इच्छा वासना कमी करायला हव्यात . भारतीय संस्कृतीचे अनुसरण करायला हवे. सत्य वचन आणि सदाचराणाच्या मार्गावरून वाटचाल करायला हवी . जीवनाकडून जे मिळाले आहे त्यामध्ये आपण संतुष्ट राहायला हवे . काम आणि पैसा यासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे थांबवले  पाहिजे . आजकाल सर्व तरुण मुले पैसे कमावण्यासाठी परदेशात जातात. तथापि त्या वस्तू आणि ती कमाई क्षणभंगुर आहे . अनित्य आहे . हे जग सोडताना आपण पैसा वा पद बरोबर घेऊन जाऊ शकत नाही . अध्यात्मिक जीवनात घेतलेल्या धड्यांनुसार केवळ सत्कर्म आणि सदगुण आपल्या बरोबर येतात . स्वामींनी गेली ८४ वर्षे जे काही आपल्याला शिकवले त्याचे आचरण , सदगुण  आपण केले पाहिजे . आपल्या जीवनात ती  शिकवण उतवरली पाहिजे . पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यू आता पुरे ! परमेश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करा . याच कारणासाठी तो महामहीम अवतार आला आणि सर्वांना शिकवण दिली . हे जग सोडतांना आपण काहीही बरोबर घेऊन जात नाही . नुसती वंशवृद्धी करून काय उपयोग ? एक उदा. पाहू या.  एका मनुष्यास एक मुलगा असतो . एक दिवस तो मृत्यु पावतो. आई वडील अत्यंत शोकाकुल होतात . त्यांचे दुःख पाहून त्यांचे गुरु येतात आणि वडिलांना देव लोकात घेऊन जातात . तेथे त्याला त्याचा मुलगा भेटतो . त्याला तो मनुष्य म्हणतो " तुझी आई आणि मी तुझ्यासाठी किती अश्रू ढाळतो आहोत. तू माझ्या बरोबर घरी परत येणार नाहीस का ? " तो मुलगा विचारतो , " तुम्ही कोण आहात ? मी इथे खूप आनंदात आहे . तुम्ही मला पृथ्वीवर का बोलावता ? तुमचा माझा काय संबंध आहे ? आणि तो मुलगा तिथून निघून जातो . मनुष्याचे मन असेच असते. कोणाचे कोणाशी नाते असते ? मृत व्यक्ति व त्यांचे कुटुंब ह्यांच्या मध्ये काहीही संबंध नसतो . मुलगा स्वर्गात असूनही त्याचे वडील दुःखी होते व मुलगा पुन्हा पृथ्वीवर यावा यासाठी प्रयत्न करत होते. त्यांना त्यांचा वारस त्यांच्या बरोबर हवा होता . त्यांचा वंश चालू राहावा व वाढावा अशी त्यांची इच्छा होती . हा किती मूर्खपणा  आहे ? तुमचा वंश खुंटो वा वाढो एक दिवस सगळ्यांचाच नाश होणार आहे . हे जाणून आसक्ती न  ठेवता तुमची कर्तव्ये पार पाडा आणि परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करा . स्वामींची शिकवण आचरणात आणा . उठा ! जागे व्हा ! तुम्ही भिकारी नाही ! तुम्ही येथे तुमच्या भिकारी वंशाच्या वृद्धीसाठी आलेले नाही ! तुम्ही महासम्राट सत्य साईची मुल आहात . जर तुम्ही हे जाणलेत तर रामकृष्ण परमहंस आणि रमन महर्षींप्रमाणेच तुमचे नांवही जगामध्ये अमर होईल . 

                                      जय साई राम  
                                                                       श्री वसंता साई

वसंतामृतमाला - विदूषक आणि भिकारी ( पुष्प दुसरे ) दि. २२/ ९/ २०१३ ला ब्लॉगवर प्रकाशित केले होते परंतु चुकून ते डिलीट झाले. करिता आज पुन्हा प्रकाशित करीत आहे . चूकीबद्दल दिलगिर आहे .


गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१३

                                 पुष्प तिसरे पुढे सुरु 

दुस-या विभागात स्वामींनी लिहिले आहे .
               .......अहंकार हा देहा द्वारे ओळखला जातो. तो देहभावाशी निगडीत असतो . अग्निला वेढणाऱ्या धुराप्रमाणे अहंकार आपल्यास वेढून टाकतो त्यामुळे आपण आपले सत्यदिव्य स्वरूप पाहू शकत नाही . अहंकाराने आपले उदात्त स्वरूप जाऊन ते खालच्या पातळीवर येते . 
            अहंकार हा देहाशी आणि देहभाव असणा-यांशी निगडीत असतो यातूनच ' मी आणि माझे ' याचा  उदभव होतो . देहाशी संबंधित असणा-या सर्व गोष्टींशी आपण आपल्याला जोडतो या मधून क्रोध , मत्सर आणि इतर सर्व दुर्गुण येतात . देहभावा  मधूनच काम , क्रोध , लोभ , मोह , मद , मत्सर हे षड् रिपू आपल्या मध्ये येतात . ज्या प्रमाणे धूर अग्निला झोकाळून टाकतो त्याप्रमाणे हे षड् रिपू आपल्याला झाकून टाकतात. त्यामुळे आपण आपले खरे स्वरूप जाणू शकत नाही . आपले खरे स्वरूप कोणते ? आपण अमर आहोत . स्वामी आपल्याला ' हे अमर पुत्रांनो ' असे संबोधतात . अमरत्व हे आपले सत्य स्वरूप आहे . हे खरे स्वरूप झाकले गेल्याने आपल्याला अमरत्व स्थिती प्राप्त होऊ शकत नाही . देहभावाशी तादात्म्य पावल्यामुळे आपण पुन्हा पुन्हा जन्म मृत्युच्या फे-यात अडकतो. जर आपण आपले खरे स्वरूप जाणले तर आपल्याला पुन्हा जन्म नाही , मोक्ष प्राप्ती होईल . हे जोपर्यंत आपण जाणत नाही तो पर्यंत पुन्हा पुन्हा जन्म मृत्यु अटळ आहे . हे सत्य ज्ञात होईपर्यंत जन्म मृत्युचे चक्र थांबणार नाही . अन्यथा आपल्याला हळूहळू क्रम मुक्ती मार्गाद्वारे मोक्ष प्राप्ती होईल. 
            सर्व जण केवळ देहभावाशी तादात्म्य साधतात . सर्व भौतिक गोष्टींशी स्वतःला बांधून घेतात . पत्नी , मुले , नातेवाईक , धन , पद , प्रतिष्ठा अशा त-हेने जीवन चक्र चालू राहते . जरी एखादा त्याचा देहभाव विसरला तर बाकीचे त्याला तसे करू देत नाहीत . 
           एक उदाहरण देते . एका व्यक्तीला एक मुलगा आहे. तो अविवाहित आहे . त्याचा एक मित्र त्याला विचारतो , ' तुझा मुलगा आता मोठा झालाय , तू त्याच्या लग्नाचे बघत नाहीस का ? तू तुझ्या मुलीच्या लग्नासाठीही प्रयत्न करत नाहीस ? त्या मुलाचे वय पाहून तो मित्र वडीलांच्या मनात त्याच्या मुलाच्या व मुलीच्या लग्नाचे विचार जागृत करतो . त्यांची लग्न होऊन एक वर्ष झाल्या नंतर तोच मित्र विचारतो , " तुझ्या मुलाला आणि मुलीला अजून अपत्य प्राप्ती झाली नाही का ?" अशाप्रकारे  आपल्या मुलांची लग्न करून देणे हे आपले कर्तव्य आहे असे पालकांना वाटते . जर पालक या बाबतीत काहीही न करता स्वस्थ  बसले तर ते जणू फार मोठे पाप करत आहेत असे इतरांना वाटते . हे जग खरोखरच किती विचित्र आहे ? युगानुयुगे केवळ ' माझे मुल आणि लग्न ' या दोन गोष्टी प्रत्येक मनुष्याच्या मनात खोलवर कोरल्या गेल्या आहेत . त्याला जास्तीत जास्त महत्व दिले गेले आहे . समाज मनुष्याला दुस-या  मार्गांचा अवलंब करू देत नाही . देहभावामुळे मनुष्य पुन्हा पुन्हा जन्मतो आणि मृत्यु पावतो. इथे सर्वांना विवाह आणि अपत्य प्राप्तीची सक्ती आहे .
                                    जय साई राम     
                                                                                  व्ही. एस.

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१३

                               पुष्प तिसरे पुढे सुरु

हे दाखवण्यासाठीच हा महाअवतार  येथे आला . वेदांनी दर्शवलेला अंतर्यामी म्हणजेच प्रत्येकाची इष्टदेवता होय . एका साई भजनात म्हटले आहे .
राम कहो , कृष्ण कहो , ईश्वर अल्ला साई कहो
बुद्ध कहो,  गुरुनानक कहो , 
झौराष्ट्र,  महावीर येशू कहो
युगावतार तुम हो विश्वशक्ती तुम हो
सर्वधर्म प्रिय साई महेशा
परब्रम्ह तुम हो
                  यामध्ये असे म्हटले आहे . स्वामी युगावतार आहेत . सर्व धर्माची प्रेम ही एकच शिकवण आहे . हेच स्वामी दर्शवतात . सर्वांनी स्वामींसमोर वेदपठणही केले तरीही लोक जात , धर्म , वंश असे भेद का मानतात ? नारायण सुक्तातही हेच सांगितले आहे . परमेश्वर सर्वांच्या हृदयात तांदुळाच्या अग्राएवढ्या नील वर्णी ज्योतीस्वरुपात वास करतो हे सर्वजण जाणतात . हे सर्वांसाठी सारखेच आहे. आपण म्हणतो," ते ब्रह्मा आहेत , विष्णू आहेत , शिव आहेत हिंदू धर्मांमध्ये विविध रूपांची भक्ती केली जाते . कोणी शिवाची भक्ती करते , कोणी विष्णूची तर कोणी ब्रम्हा आणि इंद्राची . वरील श्लोकामध्ये म्हटले आहे . भक्त परमेश्वराच्या विविध नाम आणि रुपाची भक्ती करू शकतो हृदयातील निळे तेज म्हणजेच ब्रम्हा , विष्णू,  महेश होय . हिंदू धर्मानुसार त्या निळ्या तेजात सर्वांच्या शेकडो इष्टदेवदेवतांचा  अंतर्भाव आहे. 
                    ख्रिश्चन लोकही तीच निळी ज्योत पाहतात काहींसाठी ती ज्योत म्हणजे जिझस आहे तर काहींसाठी व्हर्जिन मेरी . प्रत्येक धर्मातील लोक त्यांच्या  इष्टदेवतेला त्या निळ्या ज्योतीरुपात पाहतात हिंदू धर्म हा सनातन धर्माचे अनुसरण करणारा पहिला धर्म आहे . त्या वेळी वेदांमध्ये असे घोषित केले गेले की परमेश्वर नील ज्योती स्वरूपाने सर्वांच्या हृदयात वास करतो . हे वैश्विक सत्य आहे . स्वामींनी हे वैदिक ज्ञान यथार्थपणे स्पष्ट करून सांगितले . येथे फक्त एकच परमेश्वर आहे. स्वामींनी सर्वधर्मातील लोकांना हे दर्शवले आहे जेव्हा मनुष्य व्यक्तिगत मी चा त्याग करतो तेव्हाच सगळे एकच आहेत  याचे त्याला ज्ञान होते . व तो सर्वांवर प्रेम करू शकतो आणि नंतर मुक्ती प्राप्त करतो . ' सत्य साई स्पीक्स '   भाग ९ पान नं . ११६ वर लिहिले आहे . 
                     आज अस्तित्वात असलेल्या वेदांचे नक्की केव्हा संकलन केले गेले हे कोणालाही माहित नाही . 
                       बाळ गंगाधर टिळकांच्या तर्कानुसार हे साधारणपणे १३,००० वर्षांपूर्वी केले गेले असावे व इतरांच्या अनुमानानुसार हे ६००० वर्षांपूर्वी केले गेले असावे परंतु सर्वानुमते किमान ४००० वर्षांपूर्वी  हे केले गेले असावे . गौतम बुद्धांचा  काळ २५०० वर्षांपूर्वी होता . ख्रिस्त १९६९ वर्षांपुर्वी जन्मले तर इस्लामची स्थापना त्यानंतर ६०० वर्षांनी झाली . कालक्रमानुसार तसेच तर्कदृष्ट्या पाहिले तर वरील अनुमान बरोबर आहे की वेदिक धर्म पितामह ( आजोबा ) आहे . बौद्ध धर्म - मुलगा,  ख्रिश्चन धर्म - नातू तर इस्लाम पणतू आहे . 
                      अशा प्रकारे सर्व धर्मांचे कुळ  एकच आहे . ख्रिश्चन , हिंदू , मुस्लीम यामध्ये काहीही फरक नाही . सर्वांमध्ये तो नील ज्योती स्वरूपातील तो एकच अंतर्यामी आहे . म्हणूनच आपणां सर्वांमध्ये काहीही भेद नाही . आपण सर्व त्या एका परमेश्वराची लेकरे आहोत . 
                  उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

सोमवार, ३० सप्टेंबर, २०१३

        

         
        वसंतामृतमाला
                   ( पुष्प तिसरे )
          





बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

                                     ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


वसंतामृतमाला
पुष्प पहिले 
हंस आणि कावळा 


             काही दिवसांपूर्वी स्वामींनी त्यांच्या हाताचा फोटो दिला ज्यातून विभूती पडत होती . याविषयी मी अगोदर लिहिले आहे . त्यानंतर काही दिवसांनी , त्यांनी दुसरा फोटो दिला . त्यामध्ये अनेक जणांनी त्या विभूतीसाठी आपले हात पुढे केल्याचे दिसत होते . या अनेक हातांमधील एका हातामध्ये विभूती पडत असल्याचे दिसत होते . तेथे लाल रंगाच्या पेनाने लिहिले होते :-
              " मी जी विभूती सृजित करतो ते म्हणजे विशेष गर्भितार्थ असणारे दिव्यत्वाचे प्रकटीकरण आहे . भौतिक , अशाश्वत आणि परिवर्तनीय असणारे सगळे जळून गेल्यानंतर जे शिल्लक राहते ते ". 
               स्वामी जी विभूती सर्वांना देतात ती दिव्य असते , सृजित केलेली असते . ही अखिल निर्मिती अनित्य , अशाश्वत आणि सतत बदलणारी आहे . मनुष्य जन्मतो , वाढतो , जीवन जगतो आणि अखेर मृत्यू पावतो . मृत्युनंतर त्याची राख बनते . जीवनामध्ये तो किती दुःख , अडचणी , आनंद आणि वेगवेगळ्या मनोवस्थानमधून जातो ? सगळ्यामध्ये सतत बदल होत असतो . केवळ अखेरीस राख बनण्यासाठी तो या सर्वातून जातो . जर माणसाने सकाळपासून रात्रीपर्यंत येणारे त्याच्या मनातील विचार लिहून काढले तर ते किती असतील ? अनेक वेगवेगळ्या विचारांमधून त्याचा स्वभाव बनतो आणि खोलवर ठसे उमटतात त्यालाच संस्कार म्हणतात . जे पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यूस कारणीभूत होतात . या जगात शाश्वत असे काहीच नाही . प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते . माणूस जन्मतो आणि मृत्यू पावतो . माणसाप्रमाणेच रोपट्याचे झाडात रुपांतर होते आणि अखेर ते मरते . पशुपक्ष्यांच्या बाबतीतही तसेच आहे . जगामध्ये शाश्वत असे काही नाही असे असूनही मनुष्य अशाश्वत गोष्टींचा संग्रह करण्यात आपला वेळ खर्ची घालतो . ( उदा. नवरा , बायको , मुले , नातेवाईक इ.) तथापि एक दिवस सगळ्यांचीच राख होणार आहे . मग यासाठी एवढा त्रास का सोसावा ? परमेश्वरामधून आलेल्या सर्वांनी पुन्हा परमेश्वर प्राप्ती करायलाच हवी. परमेश्वर प्राप्ती होईपर्यंत त्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्युच्या फेऱ्यात अडकावे लागेल . ह्या जगात प्रत्येक जण वेगळा आहे . एकासारखा दुसरा नाही . जुळ्यांच्या बाबतीतही तेच लागू आहे . प्रत्येक जण वेगळा आहे . मनुष्याने त्याच्या स्वभावानुसार जीवन व्यतीत करायला हवे . तथापि तो कृत्रिम जीवन जगतो . इतरांचे पाहून तो त्यांचे अनुसरण करतो . दुसऱ्यांचे कॉपी करू नका हा अगदी प्राथमिक धडा आपल्याला शिशुवर्गातच शिकवला जातो. तरीही इतरांचे अनुकरण का केले जाते ? कारण सर्वजण आपली तुलना इतरांशी करतात . उदा.एक मनुष्य गाडी विकत घेतो . त्यानंतर त्याचा शेजारी विचार करतो की त्यालाही गाडी विकत घ्यायला हवी . एकाचा मुलगा कॉन्व्हेंट शाळेत शिकतो . दुसरा विचार करतो , " मी ही माझ्या मुलाला त्याच शाळेत पाठवेन ". एक स्त्री दागिना खरेदी करते , दुसरी म्हणते , " या महिन्यात मीही एक नवीन दागिना घेईन". अशा प्रकारे जेव्हा एखादा आपली तुलना दुसऱ्याशी करतो तेव्हा ती तुलनाच त्याला कॉपी करण्यास भाग पाडते . आध्यात्मिक बाबतीतही तसेच म्हणता येईल . एखादी व्यक्ति जर रोज आश्रमात जात असेल तर दुसरी व्यक्ति विचार करते , " मी सुद्धा जाईन ". तथापि या सर्व गोष्टी व्यक्तीमध्ये कोणताही बदल करू शकत नाहीत . आपण इतरांकडून चांगल्या सवयी आत्मसात करून आपल्यामध्ये परिवर्तन घडवले पाहिजे . आपल्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केवळ आपला जन्म आहे . प्रत्येकाने त्याच्या व्यक्तिगत वाटचालीद्वारे परमेश्वर प्राप्ती करायला हवी . या प्रवासात आपण कोणाला बरोबर घेऊ शकत नाही . प्रत्येकाने आपल्या चुका दुरुस्त करायला हव्यात . हेच स्वामींनी हंस आणि कावळ्याच्या गोष्टीतून शिकवले आहे . हंसाची चाल अत्यंत डौलदार असते . कवी एखाद्या सुंदर स्त्रीच्या पद्न्यासाची तुलना हंसाच्या चालीशी करतात . एकदा कावळ्याने हंसाची डौलदार चाल पाहिली व त्यालाही तसे चालण्याची इच्छा झाली . त्याने ते शिकण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु त्या प्रयत्नांनी त्याची अत्यंत दमछाक झाली . अखेरीस प्रयत्न थांबवले व तो स्वतःच्याच चालीकडे वळला . तथापि त्याच्या त्या प्रयत्नांमध्ये तो स्वतःची चालही विसरला . त्याचप्रमाणे जर तुम्ही इतरांचे अनुकरण केले तर तुम्ही स्वतःचा स्वभाव गमावून बसाल . हेच स्वामींनी सर्वांना बजावून सांगितले आहे . इतरांचे अनुकरण करू नका . तुमच्या स्वतःच्या स्वभावानुसार सर्व काही प्राप्त करण्याचा प्रयत्न करा . अनुकरण केवळ दिखाव्यासाठी केले जाते . परमेश्वर सर्वांच्या मनातील भाव जाणतो म्हणून दांभिकतेला थारा देऊ नका . एक उदाहरण - दोन जैन स्त्रिया येथे आल्या व त्यांनी विचारले की त्या इथे आश्रमात एक रात्र राहू शकतील का ? आम्ही त्यांना सम्मती दिली . त्या एक रात्र राहिल्या व दुसऱ्या दिवशी सकाळी निघून गेल्या . आणि आज परतीचा प्रवास करताना पुन्हा आश्रमात आल्या . त्या कोठेही जाताना दोघीच जात होत्या . त्यानंतर आश्रमात एका गाडीमधून दोन पुरुष आपले सामान घेऊन आले . त्या स्त्रियांनी " हा आश्रम कोणाचा आहे ? येथे कोण राहते ? असे कोणतेही प्रश्न विचारले नाहीत किंवा येथील कोणत्याच गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिले नाही . 
              त्या दोघींनी विश्रांती घेतली व त्यानंतर आपल्या पुढील प्रवासास निघाल्या . त्यांनी इथल्या कोणत्याच गोष्टींची दाखल घेतली नाही . त्या त्यांचा मार्ग क्रमत होत्या . आपणही असेच असायला हव . आपल्या मार्गात कोणतीही गोष्ट बाधा बनू नये . लोक काय करतात याकडे आपण लक्ष द्यायला नको .         
१८ एप्रिल २०१३ संध्या -ध्यान
वसंता :- स्वामी , लोक इतरांचे पाहून त्यांचे अनुकरण का करतात ? या विषयी मी लिहु का ?
स्वामी:- " बोधामृत "या नावाने तू ते लिही .
वसंता:- मी जेव्हा आमच्या येथील माळ्याला  पाहते  तेव्हा मला अत्यंत वाईट वाटते . किती गरीब लोक  स्वामी , कृपा करून त्यांची परिस्थिती बदला ना.
स्वामी:- तू त्याला येतांना  पाहतेस तेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू येतात . तू जेव्हा त्याच्या विषयी  विचार करतेस तेव्हा करुणा  स्त्रवते.
ह्या दोन्ही गोष्टी नक्कीच त्या मध्ये बदल घडवतील . आई आजारी मुलाला किंवा तिच्या मांडीवरील अज्ञानी मुलाला आपल्या जवळ ठेवते व त्यांची काळजी घेते . तिला आपल्या शिकलेल्या मुलांची कधीही काळजी वाटत नाही .
वसंता :- स्वामी , शिकलेली मुल इतरांचे पाहून अनुकरण करतात . या गोष्टीचा मला राग येतो .
स्वामी :- हा आईचा स्वभाव आहे.
वसंता :- स्वामी , मी एक " अज्ञानी बालक " आहे . तुम्ही सदैव मला तुमच्या मांडीवर ठेवा .
स्वामी:- तू सदैव माझ्या मांडीवर किंवा हृदयात असतेस.
ध्यान समाप्ती .
                    आता आपण पाहू या . दररोज सकाळी सहा वाजता माळी  विश्व ब्रम्ह गर्भ कोटममध्ये येतो आणि जेव्हा आम्ही येतो तेव्हा तो तेथे असतो . आरती झाल्या नंतर तो त्याच्या कामाला लागतो . पूर्वी तो दारू पीत असे व सिगरेट ओढत असे परंतु इथे आल्या नंतर त्याने त्या सवयी सोडल्याचे सांगितले . इथे येऊन अशिक्षित व अज्ञानी खेडुत लोकांमध्ये अशा प्रकारे परिवर्तन होत असल्याचे पाहून मला अत्यंत आनंद होतो . यासाठी मी स्वामींकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करते . त्याला पाहताच माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात . त्याच्या सारख्या लोकांचा उद्धार करण्यासाठी तो महामहिम परमेश्वर येथे आला. ज्यांना बहाणा करणे माहित नाही अशा भोळ्या भाबडया खेडुतांना स्वतः मधील दोष लक्षात येतात . या करीता मी त्यांच्या साठी प्रार्थना करते . जे मूल आजारी असते किंवा जे मूल अनभिज्ञ असते ते नेहमीच आईच्या मांडीवर असते व आईच त्याची काळजी घेते . तिला आपल्या मोठया मुलांची किंवा शिकलेल्या मुलांची कधीच काळजी वाटत  नाही . स्वामी माझ्या अवस्थेची आईच्या मानसिकतेशी तुलना करतात . जेव्हा शिकलेले चुका करतात तेव्हा मी क्रोधित होते आणि जेव्हा साधेभोळे लोक स्वतः मध्ये परिवर्तन घडवतात ते पाहून मी त्यांच्यासाठी अधिकाधिक प्रार्थना करते . स्वामींनी या साठी एक उदाहरण दिले . जरी आपण लसणीच्या रोपाला रोज गुलाब पाणी घातले तरी त्याचा स्वभाव धर्म ( गुणधर्म ) कधीही बदलणार नाही लसणाचा वास कायम आहे तसाच राहणार असे स्वामी म्हणतात . याच प्रमाणे आपण काही केले तरी आपल्या पूर्व वासना आपल्याला सोडत नाहीत तुम्ही लसणाला गुलाब पाण्याचा अभिषेक करा बदामी हलव्यामध्ये घोळवा तथापि त्याचा वास कधीही जाणार नाही . याच प्रकारे तुम्ही इतरांचे पाहून त्यांचे अनुकरण केले तर तुमच्या अधोगतीस निमंत्रण द्याल . त्याला उद्धरणही नाही व त्या वासना कधीही जाणार नाहीत ही स्वतःचीच फसवणूक ठरेल ही  गोष्ट अध्यात्मात केली जात नाही . एकाला जप हवा,  दुस-यास ध्यान तर कोणाला सेवा . म्हणून दुस-याचे  पाहून त्याचे अनुकरण करू नका आपल्या स्वभाव धर्मानुसारच आपण परमेश्वर प्राप्ती करायला हवी . मी पूर्वी एक गीत लिहिले 
                     नाना त-हांचे लोआहेत येथे
                     हे सकलजन आहेत पुरावा ईश कृपेचा 
                     काहींच्या अंतरंगी दडले पशु तर …… 
                     काहींच्या अंतरंगी पशुपतीनाथ 
                     परी ही  लीला असे परमेशाची 
              तुम्हाला भेटणा-या प्रत्येक माणसातील सदगुन  हेरून ते आत्मसात करा. त्याच्या कर्मांचे अनुकरण करू नका . त्याच्या गुणांचे अनुकरण करा हा महा अवतार त्या आजण , गरीब लोकांसाठी आला होता . ते अजागतेपणाने चुकीच्या मार्गावरून जातात . स्वामी आणि मी आम्ही दोघांनी त्यांच्यात बदल घडवलाच पाहिजे . माझ्या प्रार्थना आणि अश्रू केवळ त्यांच्यासाठी आहेत  आणि इतर सर्वांसाठी केवळ मी लिहित असलेले ज्ञान आहे . ते वाचा , जाणून घ्या आणि स्वतः  मध्ये परिवर्तन घडवा ! स्वामी म्हणाले,  जर अज्ञानी माणसाने चुका केल्या तर त्यांना सांगितल्या नंतर ते बदलतील . परंतु जे शिकलेले असूनही स्वतःच्या चुका लक्षात घेत नाहीत आणि त्या लपवण्याचा प्रयत्न करतात . 
                                        जय साई राम

                                                                   श्री वसंता साई  

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१३

                               गोरख नाडीग्रंथ


दिनांक : ५ ऑगस्ट , २०११
स्थळ : वैदीश्वरन कोविल, तामिळनाडु 
श्रीवसंतसाईचे  नाडीग्रंथवाचन  

                मी पार्वतीदेवीची आराधना करतो. मी गोरख , आता मातेचा नाडीग्रंथ वाचतो. नवग्रह आकाशात फिरत असताना तू, धनलक्ष्मी, कमलपुष्पावर स्थिर होतीस. नंतर तू धरतीवर येऊन जन्म घेतलास. तुझ्या 'तूळ ' या जन्मराशीमध्ये रवी, चंद्र,शुक्र व राहू सर्व एकत्र आहेत..., वगैरे. अशाप्रकारे, तुझ्या आईवडिलांच्या पोटी तू एक गुणवान बालक म्हणून जन्माला आलीस. हा नाडीग्रंथ वाचत असताना तुझे वय ७३ वर्षे आहे. तुझा विवाह होऊन तुला मुले झाली. आता सर्व मुले मोठी झालीत. तुझा विवाह मायवा कृष्णाशी झाला; तथापि विवाहानंतर  तू सदैव दुःखी होतीस . हा नाडीग्रंथ वाचत असताना तुझे शरीर अत्यंत यातना भोगत आहे . 
                 मातेने स्वामींना पाहीले तरच तिच्या शरीराला स्वास्थ्य लाभेल. त्यांचा हात हातात धरणे तिच्या प्रारब्धात आहे . त्याक्षणी जगातील सर्व लोक हा अत्यंत आनंदाचा दिवस साजरा करतील . स्वामी तिचा हात हातात घेऊन सर्वांना तिच्या स्थितीबद्दल सांगतील व तिची महती सांगतील. यावेळी मायवाचा दत्तकपुत्र सदैव त्यांच्यासोबत असेल. त्याच्याद्वारे माता आनंदानुभव घेईल. जेव्हा माता व मायवा एकमेकांपासून दूर असतील तेव्हा तो त्यांचा दूत असेल. तिला सर्व संदेश त्याच्याद्वारे मिळतील. त्याच्यामार्फत ते संदेशाची देवाणघेवाण करतील. अम्मा व स्वामी ध्यानात संवाद करतात. अखेरीस ती आपल्या पतीसमवेत भूलोकाचा त्याग करेल. त्यांनी प्रस्थान ठेवल्यानंतर हा दत्तकपुत्र, त्यांचा शिष्य, मार्ग दाखवेल. त्यानंतर ती दोघे अंतर्दृष्टीमध्ये, दर्शन देतील ; स्थूलदेहरहित आत्मदर्शन देतील. 
             पुढे ते पुन्हा जन्म घेतील व गृहस्थाश्रम स्वीकारतील. ते परमानंदात जीवन जगतील. यावेळी त्यांच्या जन्मास पूर्णत्व प्राप्त होईल, पूर्णम्. शक्तीयुग संपल्यानंतर पुन्हा कलियुग सुरु होईल.


संदर्भग्रंथ :- पवित्र नाडीग्रंथ वाचन : श्री सत्यसाईबाबा आणि श्री वसंतसाई 


रविवार, ८ सप्टेंबर, २०१३

                          अगस्ति  महाशिव नाडीग्रंथ


तारीख - २६ नोव्हेंबर १९९८
स्थळ  - अनंतपूर 
श्री वसंतसाई चे नाडीग्रंथवाचन 
         दि . २६-११-९८ रोजी श्री वसंतसाईच्या नावाने हे पान वाचण्यात आले . 
शिव - पार्वती संवाद 
         जन्मदिनांक २३ ऑक्टोबर १९३८ , बहुधान्य वर्ष , (तमीळ वर्ष ) २६-११-९८वयाची ६० वर्षे पूर्ण ६१ वे चालू आंडाळ  त्यांच्या आदर्श (Role Model ) आहेत . त्या ध्यान करतात . ६२/६३ वे वर्ष लागण्याआधी त्यांना त्याचा लाभ मिळेल . समाजामध्ये मोठा नावलौकिक प्राप्त होईल . 
            ते ६५ या वयात - त्यांचा नावलौकिक राज्यस्तरावर पोहोचेल . त्यांना धनसंपदा , मौल्यवान रत्ने या कशामध्येही रस नसेल . त्या गोष्टींचा त्यांच्यावर वर्षाव होईल . त्या गोष्टी त्यांना आकर्षित करू शकणार नाहीत . त्यांच्या  दृष्टीने त्याला काहीही महत्व नसेल . 
           कृष्णाचे नाव असलेला त्यांची अनन्य भक्ती करणारा एक शिष्य अखेरपर्यंत त्यांचाबरोबर असेल . भविष्यामध्ये त्याला त्यांचे फार मोठे सहाय्य लाभेल . 
            ७० ते ७२ या वयात - परमेश्वर कृपा , आशीर्वाद आणि सहाय्य यांचा भरभरून लाभ. त्या जे कार्य हाती घेतील ते सिद्धीस जाईल . जगाच्या उद्धाराकरता त्या दूरवर प्रवास करतील . त्यांना परमेश्वराचे आणि गुरुपीठाचे आशीर्वाद लाभतील . 
              ७२ ते ७४ या वयात काही किरकोळ समस्या उदभवतील व त्याचे निराकरणही होईल . 
          ७५,७६ या वर्षी , त्यांनी हाती घेतलेली सर्व कार्ये सिद्धीस जातील . त्यांच्या पतीचे त्यांना शेवटपर्यंत सहाय्य लाभेल . त्यांना कौटुंबिक जीवनात स्वारस्य राहणार नाही . 
           ध्यानामुळे त्यांना महादेवतेचे (महालक्ष्मीचे ) पद प्राप्त होईल . 
           ७५ ते ८० - त्या दीर्घायुषी असतील . 
       आंडाळप्रमाणेच ईश्वरामध्ये  विलीन होण्याची त्यांची इच्छा आहे . पार्वतीने शिवांना विचारले , "हे घडेल का ?" शिव उत्तरले , " हो,  ती साईबाबा नावाच्या अवतारामध्ये विलीन होईल . यानंतर तिला पुन्हा जन्म नाही ." 
          पूर्वजन्मातील नाव राधा होते . पांडवांच्या काळात जन्म . त्या भगवान श्रीकृष्णावर प्रेम करत होत्या . त्यांनी भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला . त्या जन्मात काही इच्छा अतृप्त राहिल्यामुळे त्यांनी हा जन्म घेतला . पूर्वजन्मात त्यांनी प्रार्थना केली , " मला जर पुन्हा जन्म असेल तर माझे भगवान श्रीकृष्णामध्ये विलयन व्हावे ." असा वर त्यांनी मागितला . म्हणून त्यांनी आता पुन्हा जन्म घेतला . त्या श्रीकृष्णमध्ये सदेह विलीन होतील . 

संदर्भग्रंथ :- पवित्र  नाडीग्रंथ वाचन : श्री सत्यसाईबाबा आणि श्री वसंतसाई