मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            इंद्रांनी व इतर स्वर्गीयजनांनी माझ्या तपामध्ये अडथळे आणू नये ह्यासाठी स्वामींनी त्यांना मला आशीर्वाद देण्यास सांगितले. या प्रसंगाने मी आश्चर्यचकित झाले. हे लिहिताना मला अजून एका प्रसंगाची आठवण झाली.
 
           महाभारतातील युद्धामध्ये, भीष्मांनी अर्जुनाचा पराभव करण्याची प्रतिज्ञा केली. कसेही करून भीष्म अर्जुनाचा वध करतील याची सर्वांना चिंता वाटत होती. काय करावे हे कोणालाही समजत नव्हते. त्यावेळी रात्री कृष्णाने अर्जुनाची पत्नी द्रौपदी हिला बरोबर घेऊन भीष्मांच्या तंबूत नेले. तिला तिची पादत्राणे तंबूच्या बाहेर काढून ठेवण्यास सांगून त्यांनी ती आपल्या हातात घेतली. त्यानंतर पदराने मुख झाकून घेऊन भीष्मांच्या पायांशी गुडघ्यावर बसण्यास सांगितले. कृष्णाने सांगितल्याप्रमाणे द्रौपदी भीष्मांच्या चरणांपाशी जाऊन बसली. त्यांनी तिला 'अखंड सौभाग्यवती भव' असा आशीर्वाद दिला. भीष्मांनी अर्जुनाचा वध करणे शक्य होऊ नये यासाठी कृष्णाने ही क्लूप्ती योजली असल्याचे नंतर भीष्मांना समजले. परमेश्वर त्याच्या भक्तांसाठी काय करणार नाही? एवढेच नव्हे तर त्यांनी त्यांची पादत्राणेही वाहिली.
 
              त्याचप्रमाणे माझ्या तपामध्ये इंद्र व इतर देवदेवतांकडून अडथळे येऊ नये म्हणून हे श्री साई कृष्ण, इंद्र व इतर देवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी मला त्यांच्याकडे घेऊन गेले. परमेश्वराच्या उपस्थितीत माझे तप पूर्ण होईल यात काही शंकाच नाही.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा