गुरुवार, १५ मे, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

        " जन्म मृत्युच्या व्याधीतून मुक्त होण्यासाठी परमेश्वर प्राप्ती हा एकमेव मार्ग आहे."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
            गीतेतेतील पहिल्या अध्यायाच्या दहाव्या श्लोकावर माझे वडील म्हणतात की जिथे जिथे त्यांची दृष्टी पडेल तिथे त्यांना केवळ परमेश्वराचे दर्शन होऊ दे. ते आक्रोश करतात, ' तू ये आणि मला घेऊन जा .' पुढील श्लोकात भीष्मांच्या शंखध्वनीबद्दल सांगितले आहे. ' शंख, नगारे, ढोल, मृदुंग, रणशिंगे इ. वाद्ये एकदम वाजू लागली. त्याचा प्रचंड आवाज झाला. ' माझे वडील या प्रचंड आवाजाची नादब्रम्हाशी तुलना करतात. ते म्हणतात की त्यांना या नादब्रम्हाचा ध्वनी ऐकायचा आहे. ह्या प्रचंड ध्वनीच्या माध्यमातून त्यांना परमेश्वराची नादोपासना करायची आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा लोकांमध्ये मतभेद होतात, त्यातून वादविवाद होऊन भांडणांना सुरुवात होते. माझ्या वडिलांची मनोभूमिका अशी होती की त्यांना युद्धक्षेत्रावरील तो प्रचंड ध्वनी परमेश्वराचे संगीत म्हणून ऐकायचा होता. त्यांच्या या मनोवस्थेवर चिंतन करायला हवे. त्यांचा हा दृष्टिकोन सर्वस्वी नवीन आहे व अत्यंत उच्च आहे. त्यांच्यासारखा विचार कोण करू शकेल ? बॉंबस्फोटाचा प्रचंड आवाज म्हणजे कृष्णाच्या बासरीचे स्वर असा कोण विचार करेल ? ते म्हणतात, " मला सर्वांमध्ये तुला पाहायचे आहे आणि तुझ्यामध्ये सर्वांना. तो एकच आत्मा सर्वांना व्यापून राहिला आहे. तुझ्या शंखध्वनीने माझ्या हृदयाचे दरवाजे उघडू देत. या ध्वनीचे तुझ्या मधुर मुरलीच्या स्वरात कधी परिवर्तन होईल ? मला ते कधी ऐकायला मिळेल ? इथे माझे वडील ' कान्ट्रिनिले वरूम गीतम ' या गीताचा संदर्भ देतात. त्या ओळींचा अर्थ ' वारा आपल्याबरोबर गीत वाहून नेतो ' असा आहे. स्वामींनी शब्दांमध्ये थोडा फेरफार केला.' मला वाऱ्याच्या  झुळकीमध्ये तुझे गीत ऐकू येते.' मी दुसऱ्या एका प्रकरणात याविषयी लिहिले आहे. ते म्हणतात, त्यावेळी सर्वांची  मने शांत होतील. संगीताच्या माध्यमातून उन्मनी अवस्था प्राप्त होते. सत्ययुगात कोणालाही मन नसेल. सर्वजण दिव्यानंदामध्ये तल्लीन असतील. अशा तऱ्हेने माझ्या वडिलांची इच्छा सत्युगात पूर्ण होते आहे. 

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा