ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" योग्य म्हणजे परमेश्वराशी ऐक्य, दिवसाचे २४ तास ईशचिंतन."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
कृष्णाने गीतेच्या पहिल्या अध्यायात सांगितले आहे की देहाद्वारेच तुम्ही मोक्ष प्राप्त करू शकता. माझे वडील कृष्णाला म्हणतात की त्यांच्या मनामध्ये सदैव सद्गुण आणि दुर्गुण यांच्यामध्ये लढा चालू असतो. कृष्णाने त्यांच्या मनरूपी रथाचे सारथ्य करावे. मनुष्याच्या अंतर्यामीचा आवाज त्याला बरोबर काय, चूक काय हे सांगत असतो तरीही त्याचा अहंकार त्याला ते ऐकू देत नाही व त्याचे पालन करू देत नाही. हा अंतरात्म्याला आवाज म्हणजे परमेश्वर होय. तथापि मनुष्य त्याला थारा देत नाही अशा तऱ्हेने दुर्गुणांचा नेहमी विजय होतो. माझे वडील परमेश्वरालाच सारथ्य करण्याची विनंती करून सद्गुण आणि दुर्गुण यांच्या लढ्यात सद्गुणांचा जय करण्यास सांगतात. जर आपण परमेश्वालाच आपला सारथी बनवले आणि आपले जीवन त्याच्या चरणी समर्पित केले तर तो आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाईल. माझे वडील पुन्हा परमेश्वराला म्हणतात, ' मी केवळ तुझे साधन आहे. तुझा विचार करत असताना मला मृत्यू येईल, असा मला वर दे.' दररोज अशा तऱ्हेने लिहून त्यांना मृत्यूही तसाच आला. परमेश्वराच्या चिंतनातच त्यांनी हे जग सोडले .
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा