रविवार, २५ मे, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

        "तुमच्या भावभावनांनी केवळ परमेश्वराला स्पर्श केला पाहिजे, अन्य कशालाही नाही."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ५५
 
           श्री भगवान म्हणाले," हे पार्था, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामनांचा पूर्णपणे त्याग करतो आणि आत्म्याने आत्म्यातच संतुष्ट राहतो त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
           कान्हा, मणिवण्णा, हे करुणाघना, कृपया या अतिक्षुद्र जिवाला त्याच्या मनात निर्माण होणाऱ्या सर्व इच्छांचा त्याग करू दे व त्यास आत्म्यात आत्म्याने संतुष्ट राहू दे. मला ज्ञाननिष्ठ बनव. हे दिनरक्षका, देवा, मला सतत भगवद् भावात निमग्न असणारा भक्त बनव. स्थितप्रज्ञ कर. मुमुक्ष बनव. माझे मन निरंतर दैवी लक्ष्यावर केंद्रित असू दे. मला तुमचे कार्य करू दे. सर्व काही तूच आहेस असा विचार करणारा सेवक मला बनव. ज्ञानी बनव. नित्य आणि अनित्य जाणण्यासाठी विवेकबुद्धी दे. हे नीलवर्णा, नित्यानंदा, हे वेंकटेशा, तू माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम्. 
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा