गुरुवार, २९ मे, २०२५

 


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

        " तुमच्या नेत्रांना केवळ परमेश्वर दृष्टीस पडला पाहिजे, अन्य काही नाही."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ५६
 
           दुःखामध्ये ज्याचे मन विचलित होत नाही सुखाच्या प्राप्तीची ज्याला अजिबात इच्छा नाही तसेच जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
           कान्हा, गरुडवाहना, मला द्वैतापासून विन्मुख कर. मला अचंचल मनाने दुःखे सहन करण्याची क्षमता दे. वाट्याला येणारी दुःखे तुझा प्रसाद म्हणून स्वीकारण्याची बुद्धी दे. तसेच सुखाचे क्षणही तुला प्रसाद म्हणून स्वीकारण्याची बुद्धी दे. मी सुखासीन होऊ नये. भीती काढून टाक. हरीचा मार्ग साहसी लोकांचा मार्ग आहे ना? मुरारी, मुकुंदा, या मूढालासुद्धा तुझा भक्त होऊ दे. त्याची भीती घालव. त्याला राग येऊ देऊ नकोस. हे गोविंदा, भीती पापाचे मूळ आहे याची मला जाणीव करून दे. त्याचं मन खंबीर बनव तूच माझा आसरा आहेस. शरणो शरणम्. 
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा