गुरुवार, २२ मे, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

        "तुमच्या भावभावनांनी केवळ परमेश्वराला स्पर्श केला पाहिजे, अन्य कशालाही नाही."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ५४ 
 
           अर्जुनाने विचारले, " हे केशवा, जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झाला आहे अशा स्थिरबुद्धी पुरुषाचे लक्षण काय ? तो स्थिरबुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो ?

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
           हे कान्हा, तू मला स्थितप्रज्ञाची लक्षणे सांग आणि मला स्थितप्रज्ञ बनव. हे दीनरक्षका, दयाळा, वेंकटेशा, प्रभू, तू हत्तीवरही कृपा केलीस. कृपया या दुबळ्या दासाचे रक्षण कर. पुरुषोत्तमा, पुंडरिकक्षा, भुवनेश्वरा, मला तू भुईला भार बनवून का ठेवले आहेस. मला तुझे चरण प्राप्त होऊ देत. तूच माझे आश्रयस्थान आहेस. तुझा विचार करता करताच मला मृत्यू येऊ दे. मृत्यूसमयी माझ्या मनात तुझेच विचार असू देत. हे सर्वेश्वरा, कृपया मला आपले बनव.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा