गुरुवार, ३१ जुलै, २०२५


   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

   " त्याग आणि करुणा हे प्रेमाचे दोन नेत्र आहेत. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - ९, श्लोक २७ 
 
           हे कौंतेया ! तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस ते सर्व  तू मला अर्पण कर.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          हे नीलकांता, गरुडवाहना, हा हीन जीव जे काही करतो, जे काही खातो, जे काही त्याग करतो, त्याला ज्या काही भेटवस्तू दिल्या जातात आणि तप म्हणून तो जे काही करतो ते सर्व तुला अर्पण करू देत. केशवा, मी तुझ्या चरणी नतमस्तक होत आहे. या जीवाचा उद्धार कर. महात्माजींप्रमाणे माझ्या ओठांवरही अंतसमयी तुझेच नाम येऊ दे. मी तुझे नामस्मरण करत असतानाच मला मृत्यू येऊ दे. तू माझा आश्रय आहेस.शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


रविवार, २७ जुलै, २०२५

 

   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

        " जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - ९, श्लोक २६ 
 
           जो कोणी मला प्रेमाने आणि भक्तीने एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण करतो त्याचा मी स्वीकार करतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          हे कान्हा  नीलश्यामा, विश्वामधली सर्व फुले, पाने, फळे आणि तीर्थे मी तुला अर्पण करतो. या दुबळ्या दासाचे मन, बुद्धी, जाणीव, आत्मा, पंचमहाभूते, पंचकारण, दहा जीवनावश्यक वायू, पत्नी, मुलेबाळे, घरदार, धनदौलत, सुखदुःख, शेतीवाडी, सर्वकाही मी तुला अर्पण करतो. या यःकश्चित जीवाचे रक्षण. हे करुणेश्वरा, अच्युता, आपद्बांधवा, या असुरक्षित अनाथाला तुझी प्राप्ती होऊ दे. हे प्रभू, तू माझे आश्रयस्थान आहेस.
शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २४ जुलै, २०२५

 

   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

        " मनामध्ये सदैव सत्प्रवृत्ती दुष्प्रवृत्ती यांच्यामध्ये लढा चालू असतो. मनुष्याने आत्मविश्लेषण करून मनाचे मंथन केले पाहिजे."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - ८, श्लोक ५ 
 
           जो पुरुष अंतः काळीही माझेच स्मरण करीत देहत्याग करतो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो यात मुळीच शंका नाही.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          हे पुरुषोत्तमा, सत्या, सत्यव्रती, अहिंसामूर्ती, महात्मा गांधींनी छातीत गोळ्या घुसत असताना ' हरे राम हरे राम ' उच्चारण केले. माझ्या गुरूंनी त्यांच्या मृत्युद्वारे मला मार्ग दाखविला. हे पाहूनही हा महापापी, अजून अज्ञानी आहे. बद्रीनारायणाच्या प्राप्तीसाठी सदैव चिंतन करण्याचा प्रयत्न करत असता मानस हा देह व हे जीवन या विषयी ममत्व आहे. हा घोर पापी अक्षम्य गुन्हे करतो आहे आणि भारतमातेला भार बनवून राहिला आहे.  हे भगवान, मला निरासक्त आणि निरीच्छ मन दे. मला तुझे चरण धरून ठेवण्यासाठी भक्ती दे. तू माझे आश्रयस्थान आहेस.शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

बुधवार, २३ जुलै, २०२५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
दुपारचे ध्यान मी धावतच स्वामींकडे गेले आणि म्हणाले:
वसंता: स्वामी मला असं वाटतंय की मी खूप दिवसात तुमचे दर्शन घेतले नाही.
स्वामी: अगं आपण सकाळीच तर बोललो ना. त्याला खूप वेळ म्हणायचे का?
वसंता: आज कोणाचे दर्शन, स्वामी?
स्वामी: तूच सांग तुला कोणाचे दर्शन घ्यायचयं ?
वसंता: मला नाही माहित तुम्हीच सांगा. माझी कोणतीही व्यक्तिगत इच्छा नाही.
स्वामी: नाही तुझी काय इच्छा आहे?
वसंता: मला माहित नाही. तुम्हीच ठरवा. तुम्ही सर्वांमध्ये विद्यमान आहात. म्हणून मला अळीपासून ते ब्रम्हापर्यंत सर्वांचे आशीर्वाद हवेत. असे म्हटले आहे ना.
स्वामी: ठीक आहे.  संन्यास यामध्ये आदर्श उदाहरण कोण आहे?
वसंता: मला माहित नाही. तुम्ही सांगा.
स्वामी: शुकमुनी. त्यांनी कृष्ण लिलांची महती गायली. परमेश्वराचे अमृत माधुरी.....

             स्वामी आणि मी एका ठिकाणी गेलो. मी आत गेले. तेथे मी शुकमुनींना पाहिले. ते गहिवरून म्हणाले," मी तुम्हाला माझी पुत्री म्हणू का महालक्ष्मी म्हणू?" माझे डोळे पाणावले. मी त्यांच्या पायावर लोळण घेतली. त्यांनी मला आशीर्वाद दिले. मी एवढी भावनावश का झाले, मला इतके गहिवरून का आले ह्याचे मला आश्चर्य वाटले.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

रविवार, २० जुलै, २०२५

   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

        " मनामध्ये सदैव सत्प्रवृत्ती दुष्प्रवृत्ती यांच्यामध्ये लढा चालू असतो. मनुष्याने आत्मविश्लेषण करून मनाचे मंथन केले पाहिजे."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - ३, श्लोक ३३ 
 
           ज्ञानी मनुष्यसुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कर्म करतो कारण प्रत्येकजण त्रिगुणांद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कर्म करतो. मग बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे?

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          हे कान्हा, मनिवण्णा, तू म्हटलेस की ध्यानी सुद्धा त्याच्या स्वभावानुसार व्यवहार करतो. तू मला ध्यानी बनव. मला माझ्या स्वभावानुरूप वागू देत. तू म्हणतोस की निर्बंध निरुपयोगी आहेत. या दुबळ्या दासाला जर तू निर्बंध घातले नाहीस, तर तो मोकाट सुटलेल्या गाईप्रमाणे या तुझ्या अद्भुत विश्वबगीच्याची नासधूस करेल नं ? कृष्णा, त्याला काठीने जोडपून काढ. त्याला योग्य मार्ग दाखव. त्याला चांगली कुरणे चरू देत. हे प्रभू! परमेश्वरा, नीलवर्णा, रुक्मिणीवरा, शरणो शरणम्. या चांडाळाला पवित्र बनव. तू माझा आशय दाता आहेस. माझ्यातील तमोगुण शिरजोर झाला आहे.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १७ जुलै, २०२५

 

  ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

" साधना, साधना, साधना! केवळ साधनेद्वारे जीव शिव बनतो. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ७२ 
 
           हे पार्थ! ब्रम्हाला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. ही स्थिती प्राप्त झाल्यावर योगी कधी मोहित होत नाही आणि अंतकाळीही या ब्रह्मस्थितीत स्थिर होऊन ब्रम्हानंद मिळवतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          कान्हा, तू माझा आश्रयदाता आहेस. मी तुला शरण आलो आहे. हे सर्वेश्वरा, या नम्र दासाला आत्मसाक्षात्कार होऊ दे. माझा संभ्रम दूर होऊ दे. मृत्युसमयी माझ्या मनात तुझेच विचार असू देत. जेव्हा हे मृत काष्ट धारातीर्थी पडेल तेव्हा गांधीजींप्रमाणे तुझे नाव घेत माझा प्राण जाऊ देत. मला परमानंद व परमधान प्राप्तीसाठी आशीर्वाद दे. आदिनारायणा, आपद् बांधवा तू माझे  आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १३ जुलै, २०२५

  ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

" साधना, साधना, साधना! केवळ साधनेद्वारे जीव शिव बनतो. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ७१ 
 
           जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून आसक्ती इच्छा आणि अहंकार यापासून मुक्त होऊन राहतो त्यालाच शांती मिळते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          कान्हा, माझ्या सर्व मनोकामनांचा त्याग करण्याची मला बुद्धी दे. मला संन्यासी बनव. 'मी आणि माझे' यांचा नाश कर. तुझ्या मालकीच्या सर्व गोष्टी, माझ्या समजणाऱ्या मी किती मूर्ख आहे! माझ्यावर तुझे स्वामीत्व आहे, हो ना ? हे प्रभू, या श्वानाला सदैव तुझ्या चरणांशी ठेव. माझा अहंकार नष्ट कर. मला मनो शांती दे, तूच माझा आधार. शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १० जुलै, २०२५

  ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

       " साधना, साधना, साधना! केवळ साधनेद्वारे जीव शिव बनतो. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ७० 
 
           ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी सर्व बाजूंनी भरलेल्या समुद्राला विचलित न करता त्याच्यामध्ये समावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करता सामावून जातात. तोच पुरुष परम शांतीला प्राप्त होतो, भोगाची इच्छा करणारा नव्हे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          हे कान्हा, जशा महासागराला अनेक नद्या येऊन मिळाल्या तरी तो विचलित होत नाही तसे मला इच्छांनी विचलित होऊ देऊ नकोस. माझ्या मनातील लालसायुक्त विचार दूर कर. कान्हा, गरुडवाहना, कस्तुरीरंगा, तू माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


गुरुपौर्णिमा संदेश 

 
             स्वामी म्हणाले, " जेव्हा पशु वृत्ती दूर होते तेव्हा दिव्य भाव ओसंडून वाहू लागतात याउलट सर्वांची मनं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आसक्ती आणि तिरस्कार यासारख्या पशुवृत्तींनी व्यापलेली आहेत. हे असे हे अमानवी भाव दूर केले पाहिजेत. प्रेम, प्रेम आणि प्रेम हाच मनुष्याचा खरा गुण आहे. स्वामींनी जीवन जगण्याचा एक सोपा मार्ग शिकवला आहे - " सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा " सदैव सर्वांना मदत करा, कोणालाही कधीही दुखावू नका." हाच तो सोपा मार्ग आहे. जर तुम्ही स्वामींच्या ह्या  सोप्या शिकवणीचे अनुसरण केले तर तुमचे दुर्गुण तुमच्यामधून पलायन करतील.
             विनयशीलता हे खऱ्या शिक्षणाचे वैशिष्ट्य आहे. खऱ्या शिक्षणाने मनुष्य विनयशील बनला पाहिजे अन्यथा ते निरर्थक आहे. पदव्या आणि ६४ कलांमध्ये प्राविण्य मिळवण्याचा काय उपयोग? यापैकी कोणतीही गोष्ट तुम्हाला मोक्ष प्रदान करणार नाही. काल मी ६४ कलांमध्ये प्रवीण असणाऱ्या नारदांविषयी लिहिले. रावणाला हे सर्व  ज्ञान होते आणि तो कैलासाला उचलण्यासही सक्षम होता तथापि त्याचा ठायी अनेक दुर्गुण होते त्यामुळे त्याचे हे सर्व ज्ञान व्यर्थ ठरले. त्याच्या दुर्गुणांमुळे त्याचा आणि त्याच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला म्हणून सर्वांनी सावध राहा, अहंकार, गर्व तुमचे पशुमध्ये परिवर्तन करेल. तुमच्यामधील दुर्गुणांचा नाश करण्याचा निकराने प्रयत्न करा आणि सर्वांप्रती विनम्रता बाळगा. परमेश्वर प्रत्येकामध्ये आणि प्रत्येक वस्तूमध्ये विद्यमान आहे. तुमचे प्रेम सर्वांप्रती प्रवाहित होऊ दे. जर प्रत्येकामध्ये परमेश्वर वास करतो तर तुम्ही कोणाविषयी क्रोध वा तिरस्कार कसे दर्शवू शकता? जेव्हा तुम्ही एखाद्यावर क्रोधित होता तेव्हा तो क्रोध यांच्यामध्ये वास करणाऱ्या परमेश्वराकडे जातो. स्वामी भूतलावर आले आणि त्यांनी सर्वांना वेद, उपनिषद, गीता आणि धर्मग्रंथांमधील ज्ञानाची शिकवण सहज सोप्या पद्धतीने दिली त्यामुळे सर्वांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अध्यात्माचे अनुसरण करणे शक्य झाले.आपण सर्वांनी सत्य, धर्म, प्रेम आणि अहिंसेचा भाव विकसित केला पाहिजे त्यानंतर शांती आपोआप आपल्याकडे येईल.

- श्री वसंत साईंच्या सत्संगातून

 
 
जय साईराम


बुधवार, ९ जुलै, २०२५


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
१९ जानेवारी २००१ प्रातः ध्यान.
वसंता: स्वामी, आज तुम्ही मला कोणाचे दर्शन घडवणार आहात ?
स्वामी: गरुडाचे.
             त्याचक्षणी गरुड तेथे उपस्थित झाला. मी त्याच्याकडे आशीर्वाद मागितले. गरुड रुपात रूपांतरीत होऊन त्याने स्वामींना व मला हार घातला. आम्ही दोघं गरुडावर बसून रुपेरी बेटावर गेलो. किती सुंदर अनुभव! मला अश्रू अनावर झाले त्यानंतर.

वसंता : स्वामी, हे स्वप्न आहे की सत्य ? मला काही समजेनास झालय. लोकांचा ह्यावर विश्वास बसेल ?
स्वामी : तु नेहमी विचारतेस की हे सत्य आहे का कपीलकाचित. हे सर्व सत्य आहे. भविष्यात अधिक विस्मयकारक गोष्टी घडतील. कोणी स्वप्नातही पाहिले नसेल असे अनुभव तुला येतील.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

रविवार, ६ जुलै, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

       " मनाने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यानंतर, ते मन आणि ती गोष्ट एक होऊन जाते. परमेश्वराचा ध्यास घेतलेले मन परमेश्वर बनते. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ६९ 
 
           सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्र असते अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागृत असतो आणि त्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी मात्र जागृत असतात, ती  परमात्मतत्त्व जाणणाऱ्या योग्याला रात्रीसारखी असते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          हे कान्हा, आपद्बांधवा, जेव्हा सर्व जीवांची रात्र असेल तेव्हा मला जागी ठेव. मला सर्व भूतांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती दे. तत्वे जागृत असता तू निद्रिस्त होशील, नाही का? मला हे व्हायला नकोय. अहो बाप्पा, तुम्ही सदा सर्वकाळ जागेच असायला हवे. तुमची क्षणभराची गफिलतासुद्धा सेवकाला हादरवते. अनाथरक्षका, आदिनारायणा, कृपया तू मला आपलेसे कर. तूच माझा आश्रय! शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, ३ जुलै, २०२५

 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

       " जेव्हा प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पित केले जाते तेव्हा त्याचा योग होतो."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ६८ 
 
           म्हणून हे महाबाहो! ज्याची इंद्रिय विषयांपासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात त्याची बुद्धी स्थिर असते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          हे कान्हा, मणिवण्णा, सर्व विषयांच्या बाबतीत मी माझ्या इंद्रियांवर संपूर्ण ताबा ठेवायला हवा. मला पूर्ण नियंत्रण क्षमता दे. ज्ञानामध्ये स्थिर कर. हे विश्वेश्वरा नित्या सत्या तूच माझा आधार.शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम